केरळमध्ये मोठी दुर्घटना, प्रवासी बोट उलटली, २१ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

भारत

सोमवारची सकाळची सुरुवात हि धक्कादायक बातमीने होताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा लाँग विकेण्ड पकडून अनेक जण फिरायला गेले होते. मात्र या वेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली नाव उलटून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. केरळमधील (Kerala) मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी ७ मेला संध्याकाळी सुमारे ४० प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन २१ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २१ वर पोहोचली असून ७ जणांची प्रकृती जास्त गंभीर आहे. सुरुवातीला बोट उलटली त्यावेळी ९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आणखी १५ जणांचा मृत्यू झाला. पण रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. बचाव पथकांचे शोधकार्य अजूनही सुरु आहे.

बोटीखाली आणखी नागरिक अडकल्याची भीती तसेच तात्काळ बचाव कार्याला देखील सुरुवात

दुर्घटनाग्रस्त बोटीखाली आणखी नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ बचावकार्य सुरु केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. नागरिकांचा शोध घेणे, जिवंत असलेल्यांना वाचवणे आणि जखमींना रुग्णालयात घेऊन जाणे ही प्रक्रिया रात्रभर सुरु होती.

kerala boat accident

क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा बोटीतून प्रवास त्यामुळे हि दुर्घटना घडल्याची शक्यता

ही घटना सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम इथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून ३०० मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू समोर आलेले नाही. परंतु, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणे नसल्याचे बोलले जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

या अपघातानंतर राज्याचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींवर तज्ज्ञांकडून तातडीने उपचार मिळावेत आणि शवविच्छेदन प्रक्रियाही जलद गतीने व्हावी, जेणेकरुन मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांच्या ताब्यात देता येतील, असे निर्देश आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिले आहेत. तिरुर, थिरुंगडी, पेरिंथलमन्ना रुग्णालये आणि मंचेरी वैद्यकीय महाविद्यालयात थ्रिसूर आणि कोझिकोड सारख्या जिल्ह्यातील डॉक्टरांसह पुरेसे कर्मचारी आणून शवविच्छेदन केले जाईल. आरोग्य मंत्र्यांनी सकाळी ६ वाजल्यापासून शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि शक्य असल्यास ते खाजगी रुग्णालयातही करावेत, असे निर्देशांमध्ये म्हटले गेले आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. यासोबतच त्यांनी ट्वीट करुन आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.

हे हि वाचा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली, ७ ते ८ जणांचा मृत्यू, तात्काळ मदतीला सुरुवात

Follow Us on Facebook