Marathi Suvichar | 1200+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार !

Quotes

माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. सुविचार हे आत्म-सुधारणेसाठी शक्तिशाली साधने आहेत. ते आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देतात. सुविचार आपल्या स्वप्नांवर आणि आकांक्षांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून देखील कार्य करतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार सुविचार आहेत तो कधीही एकटा नसतो. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार Marathi Suvichar १००% आचरणात आणायला हवेत.

Marathi Suvichar

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

marathi suvichar

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.

marathi quotes

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

100 suvichar in marathi

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

Marathi Suvichar

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

changle vichar marathi

प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

life marathi suvichar

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

sundar vichar marathi

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

changle vichar

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

suvichar in marathi

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

suvichar marathi

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो,
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

whatsapp suvichar marathi

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !

Marathi Suvichar

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका,
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते,
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात,
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

Suvichar in Marathi

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही,
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !

चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

सत्तेशिवाय शहाणपन काय कामाचे!

निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.

छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.

Marathi Suvichar

आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.

फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,
अहिंसा हे सबलांचे.

परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.

प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा
मी कुणासाठीतरी आहे
ही भावनाच किती श्रेष्ठ !

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
ज्ञान तुमचेच रक्षण करते.

आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका.

Changle Vichar Marathi

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून
दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

काम करणे हे जर अटळ आहे तर
ते काम हसत हसत का करू नये?

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.

जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो,
दुर्बल मनाचा मनुष्य
कधीच महात्मा होऊ शकत नाही.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे;
त्याचा अनादर करू नका.

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.

काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही
कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.

शारीरिक सौदर्य कालांतराने नष्ट होते,
पण आत्मिक सौदर्य कधीच नष्ट होत नाही.

ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय.

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

केवळ योगायोग असे काहीही नाही,
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.

रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका .
शहाणपणाने काम करा.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो,
त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते.

स्तुतीने चांगली माणसे सुधारतात,
तर वाईट माणसे बिघडतात.

परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय,
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

आपली बाग सजवताना दुसऱ्यांची
फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.

चिंतेऐवढे शरीराचे शोषण
दुसरे कोणीही करू शकत नाही.

मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात
हा प्राथेनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

परमेश्वाराची कृपा होते पण,
श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.

माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे,
तर गुणांनी प्राप्त होते.

Sundar Vichar Marathi

झाडावर प्रेम करणारा
माणूस सदैव प्रसन्नच असतो.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान
श्रेष्ठ दर्जाचे असते.

क्रांती हळूहळू घडते;
एका क्षणात नाही.

बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत
सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

अज्ञानाची फळे नश्वर असतात,
ती सकाळी जन्माला येतात,
आणि सायंकाळी नष्ट होतात.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

तलवार ही शौर्याची नव्हे;
भीतीची निशाणी आहे.

खिडकी म्हणजे आकाश नसतं.

जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे,
परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.

वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

कविता म्हणजे भावनांचं चित्र!

गुलाब पाणी देणाऱ्या हातांना
त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.

जीवनाला अखेरची रेषा नसते.
ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.

विचार कराण्यासाठी वेळ द्या,
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा,
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे,
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल,
तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका,
आणि जर का घेतले तर,
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

Marathi Suvichar

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय
मोती मिळत नाहीत.

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

दुसऱ्याला सावली देण्यासाठी
झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका;
आहे तो परिणाम स्वीकारा.

श्रध्देच्या जोरावर
असाध्य गोष्टी साध्य करता येतात.

आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की
दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.

अश्रु येणं हे माणसाला
हृदय असल्याचं द्योतक आहे.

जे तलवार चालवतील ते
तलवारीनेच मरतील.

मरण हे अपरिहार्य आहे,
त्याला भिऊ नका.

नाव ठेवणे सोपे आहे,
परंतु नाव कमावणे खूप अवघड.

मराठी सुविचार संग्रह

आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

निंदकाचे घर असावे शेजारी.

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.

तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं
आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

तुमचे सौख्य तुमच्या
विचारांवर अवलंबून असते.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

दुःखाची चव घेण्यापेक्षा ते
पचवण्यात अधिक गोडी आहे.

चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

नियम अगदी थोडा असावा
पण तो प्राणापलिकडे जपावा.

आयुष्यात सर्वात जास्त
विश्वास परमेश्वरावर ठेवा.

माझे ते खरे म्हणण्यापेक्षा
खरे तेच माझे म्हणा.

सर्वात मोठे पाप म्हणजे
अन्यायाशी तडजोड.

अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात.

Marathi Suvichar

माणंसाकरिता धर्म आहे,
धर्माकरिता माणसे नाहीत हे लक्षात घ्या.

अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

जीवन जगण्याची कला
ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.

विचार बदला; आयुष्य बदलेल.

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं;
त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

मरण जवळ आलं म्हणून
जगायचं कुणी थांबतं का !

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप !

आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.

आचाराच्या उंचीवरच
विचारांची भव्यता अवलंबून असते.

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

100 Suvichar in Marathi

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत
त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !

मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत
त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं;
पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

इतिहास घोकण्यापेक्षा
इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

लक्षात ठेवा-आयुष्यात
कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला,
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

कोमलता हा हृदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म.
देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा
आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.

आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो;
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता
पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

घोंगड्याने काम भागत असेल
तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

छोटे लोक नसते तर मोठ्या
लोकांचे अस्तित्व शून्य असते.

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

चारित्र्यात सूर्याची तेजस्विता
अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी.

ज्याच्या गरजा कमी,
त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !

मराठी सुविचार स्टेटस

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो
यावर आयुष्याकडे पाहाण्याचा
आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते,
त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर,
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.

जीवनातला अंध:कार नाहीसा
करणारी ज्योत म्हणजे हास्य !

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख का येतं ?
कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती,
क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून !

आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

बदलण्याची संधी नेहमी असते,
पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

Marathi Suvichar

टाकीचे घाव सोसल्याशिवाय,
दगडाला देवपण येत नाही.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते,
आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल
तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून
समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस
हे गुण तिच्यात आपोआप येतात.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता,
तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.

ध्येयाचा ध्यास लागला;
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

नशीब रुसलं तर किती रुसेल,
आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

नियमितपणा हा दुसऱ्याच्या
वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला
फुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण
काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो,
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

मोठ्या लोकांचा मत्सर करु नका;
कारण त्यामुळे तुमचा क्षुद्रपणा प्रकट होतो.

रडण्याने भविष्य बदलत नसते.

Marathi Suvichar Sangrah

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

विचार कुठुनही घ्यावेत
पण घेताना ते पारखून घ्यावेत.

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक
करायलाही मन मोठं लागतं.

संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात.
तालाची एक मात्रा चुकली तरी
त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात.
म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं
स्वत:लाही आणि इतरांनाही !

प्रत्येक क्षण अपल्याला
काही ना काही शिकवत असतो.

व्यायामामुळे बुध्दी आणि मन
दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

सोप्यातले सोपे कामही
अविचाराने केल्यास अधिक अवघड बनते.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

जग भित्र्याला घाबरवते
आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

स्वत:च स्वत:चे न्यायाधीश बनू नका.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही;
तो स्वतःहून शिकतो.

आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे;
जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.

ऐकावे जनाचे करावे मनाचे.

एका वेळी एकच काम
आणि तेही एकाग्रतेने करा.

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी
अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.

काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे.
अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.

जो वेळ वाया घालवतो,
त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने
त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि
तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.

तुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी
तेवढीच तुमची बदनामी जास्त.

मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ

पाप ही अशी गोष्ट आहे,
जी लपवली की वाढत जाते.

प्रत्येक माणसाचा सर्वात
मोठा शत्रू तो स्वत:च असतो.

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.

ज्याच्याजवळ पैशाशिवाय
दुसरे काहीच नाही तो सर्वात गरीब!

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

कधीकधी अपमान सहन केल्याने
कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

विश्वास म्हणजे मनुष्याला
जीवंत ठेवणारी शक्ती होय.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

उषःकाल कितीही चांगला असला तरी,
सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

सर्वात चांगले पाहूणे तेच की जे
कधीच पाहूणचार घेत नाहीत.
येतो म्हणतात पण येत नाहीत.

या जगात एकच जात आहे- माणूस !
आणि धर्मही एकच- माणूसकी!

जीवन नेहमीच अपूर्ण असते
आणि ते अपूर्ण असण्यातच
त्याची गोडी साठवलेली असते.

नवीन गोष्ट शिकण्याची
ज्याची उमेद गेली तो म्हातारा.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे,
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे,
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय
जीवन आंधळे आहे.

जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही.

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा
ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर
आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही,
परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.

भव्य विचार हा सुगंधासारखा असतो;
तो पसरावावा लागत नाही;
आपोआप पसरतो.

Marathi Quotes

दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे
हाही एक अनुभवच आसतो.

दुःख गरूडाच्या पावलाने येतं
आणि मुगींच्या पावलांनी जातं.

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

दोष लपवला की तो मोठा होतो,
आणि कबूल केला की नाहीसा होतो.

पिंजऱ्यात कोंडून पाखरं
कधीच आपली होत नाहीत.

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून
आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

गवताची दोरी वळली म्हणजे
तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो,
तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

Marathi Suvichar

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा, लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा,
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

जीवनात त्रास त्यांनाच होतो,
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही,
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

Quotes in Marathi

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते,
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;
मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.
कारण सौंदर्य नष्ट होते.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे,
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो,
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.

मराठी सुविचार छोटे

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

हृदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.

हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.

आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

न मागता देतो तोच खरा दानी.

चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.

केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

Marathi Suvichar

कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.

शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही.

कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

आधी विचार करा; मग कृती करा.

विज्ञानाचं तंत्र शिका
पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो.

न्यायाची मागणी करणाऱ्याने
स्वतः न्यायी असले पाहिजे.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

मराठी कोट्स

जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

वैराने वैर वाढेल,
परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून
आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.

आवड असली की सवड आपोआप मिळते.

सत्याने मिळतं तेच टिकतं.

जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

अंथरूण बघून पाय पसरावेत.

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे;
मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते
तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

गुलाबाला काटे असतात असे म्हणून
रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो
असे म्हणत हसणे उतम !

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात:
म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात,
पण शूर माणसे एकदाच जन्मतात,
आणि एकदाच मरतात.

जो गुरुला वंदन करतो;
त्याला आभाळाची उंची लाभते.

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर,
प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.

माणसाचा सगळ्यात मोठा
सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा,
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

माणूस नेहमी प्रगतीशील असला
तरच मोठा होण्यासाठी धडपडतो.
अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो.

जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

मराठी सुविचार संग्रह pdf

भाकरी आपल्याला जगवते आणि
गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.

जीभ जिंकणारा जग जिंकतो.

संभ्रमाच्या वेळी नेहमी
आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.

समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.

चेहरा हा आपल्या
व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

Marathi Suvichar

जीवन हा हास्य आणि
अश्रू यांचा सुरेख संगम आहे.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

विचार परीपक्व झाले की शब्दांचे
रूप देऊन कागदावर उतरवता येतात.

राजाला फक्त राज्य मानते,
तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व.

आयुष्यात कुठलीच नाती
ठरवून जोडता येत नाही.

प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.

कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.

कीर्ती ही सावलीप्रमाणे
सदगुणांबरोबर वावरत असते.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.

हात उगारण्यासाठी नसतात;
उभारण्यासाठी असतात.

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.

सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले.

प्रत्येक काळ्या ढगाला
रूपेरी किनार असते.

सदगुणांवर हल्ला केला
तरी त्याला इजा होत नाहीत.

उलटा केलेला पिरॅमिड
कधीच उभा राहू शकत नाही.

जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

पोहरा झुकल्याशिवाय,
विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू
अधिक दुःखदायक असतो.

मराठी सुविचार व त्यांचे अर्थ

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

अंथरूण बघून पाय पसरा.

माणसाने माणुसकी सोडली
की त्याचे रूपांतर पशूत होते.

कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून घेतला तर तो गोड लागतो.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.

ज्याला काय लिहावं यापेक्षा
काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक !

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे,
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

एकदा तुटलेलं पान झाडाला
परत कधीच जोडता येत नाही.

आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला
अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.

आशा ही उत्साहाची जननी आहे.

आयुष्यात खरं प्रेम,
खरी माया फार दूर्मिळ असते.

आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.

आयुष्यात सगळ्याच गोष्टी
आपल्याला जमतील असं नाही.

आशा हीच जीवनाची
सर्वात मोठी शक्ती असते !

अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगूर असतो.

उद्योगी माणूस कधीच निर्धन नसतो.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते,
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

सुंदर सुविचार मराठी मध्ये

कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज
तिची खरी किंमत कळत नाही.

पुढचा आपल्याशी चांगला वागेल
या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा
आवक पाहून खर्च करावा.

गवताच्या पात्यावरुन
वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

घटनांना विचारांचे स्वरुप देणे
हे वाङमयाचे कार्य आहे.

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला असं समजा.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही,
तो जगावर काय प्रेम करणार !

श्रध्दा असली की सृष्टीतल्या
प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो,
आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

जे अंत:करणातून येते,
तेच अंत:करणाला जाऊन भिडते.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

Marathi Suvichar

जो स्वत: दु:खातून गेला नाही
त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?

ज्योतीचं महत्त्व आणि पावित्र्य हे
अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळंत.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो,
आणि लोक हसत असतात,
मरताना आपण असं मरावं की,
आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.

कलेशिवाय जीवन म्हणजे
सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

यश न मिळणे याचा
अर्थ अपयशी होणे असा नाही.

झऱ्याचे रुपांतर नदीत होते,
आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात,
वाईट सवयींचेही असेच होते.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे,
आपण कानांनी ऐकतो ते खोटं,
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

थोर काय अगर सामान्य काय !
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.

दु:ख विभागल्याने कमी होते,
आणि सुख विभागल्याने वाढते.

आयुष्यातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.

शिक्षणाला जीवनाचे उद्दीष्ट
बनवण्यापेक्षा जगण्याचे साधन बनवा.

तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.

आजचा सुविचार मराठी मध्ये

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो,
तो आपोआप जिरू द्यावा लागतो.

काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.

नाही म्हणायचे असते तेव्हा
नाही म्हणण्याची हिम्मत ठेवा.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

लहानांना मोठं करण्यासाठी
मोठ्यांना लहान व्हावं लागतं.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा आत्ताच !

विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते,
तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही.

Marathi Suvichar

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस
संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा,
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

दुःख हे बैलालासुध्दा
कोकिळेसारखं गायला लावतं.

संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा
दु:ख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो.

हसण्याचं मोल काय आहे
हे रडल्यावरच कळतं.

जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही
ते सद्विचाराने चालते.

श्रद्धेच्या जोरावर
असाध्य गोष्टीही साध्य करता येतात

परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा.

प्रवासावरुन केव्हा परतावे हे
ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.

दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे
या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं
राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे
त्याच्या दुःखातला सहभाग होय.

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

हे हि वाचा : Marriage Anniversary Wishes in Marathi

Marathi Suvichar for Students

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच
जन्माला आलेली असतात.

पापी माणसाला पाप
कधीही शांतपणे झोपू देत नाही.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

गैरसमज कधीही मनात ठेवू नये,
त्याचे निराकरण करावे.

जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते,
तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ट होत नाही.
जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,
तेव्हा त्याचे काहीतरी नष्ट होते.
परंतु, जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते
तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते.

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा
हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा
हेही समजायला हवे.

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान !
कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.

शहाणा मनुष्य स्वत:च्या
उत्पन्नाप्रमाणेच स्वत:चे जीवन जगतो.

जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,
तर त्याच्याकडे काही मागू नका.

त्याने जे दिले आहे,
त्याबद्दल त्याचे आभार माना.

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि
अनंतकाळाची माता असते.

मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.

हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे
स्वत:ची विक्री केल्यासारखे आहे.

परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते,
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.

माणसे जन्मतात आणि मरतात,
पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

क्रांती तलवारीने घडत नाही;
तत्वाने घडते.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

Marathi Suvichar with Meaning

खोटी टीका करू नका,
नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.

मनाला आंनद देण्याचा कोणत्याही
पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे
हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही;
स्वस्थ राहण्याने मात्र होते.

जीवन जगण्याची कला हीच
सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून
कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,
तो म्हणजे रात्र.

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.

जखम करणारा विसरतो पण
जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

शहाणपणाचे प्रदर्शन करणारा
पोपट कायमचा बंदिवान होतो.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

क्रोध माणसाला पशू बनवतो.

हे हि वाचा : Marathi Status

मित्रांनो जर तुम्हाला Marathi Suvichar मराठी सुविचार संग्रह आवडला असेल तर जरूर शेअर करा व आम्हाला Facebook, Twitter आणि Instagram वर जरूर फॉलो करा.