कधी व कसा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते ?

वास्तुशास्त्र, शास्त्र

 शास्त्रांनुसार देवदेवतांच्या  पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा विधी मनाला जातो. तो दिवा लावण्याचा . दिव्याशिवाय कोणत्याही प्रकारची पूजा अपूर्ण मानली जाते.

ज्या प्रकारे एक दिवा अंध:कार नाहीसा करतो. त्याप्रमाणेच हा दिवा पूजेच्या वेळी आपल्या मनातील अंध:कार दूर करण्याचा संकेत मानला जातो.

कधी व कसा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते ?
कधी व कसा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते ?

घरातील देवघरामध्ये रोज सकाळी व संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो. त्यामुळे या घरावर सतत  दैवी कृपेचा वरदहस्त कायम राहतो.

 त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्यामुळे बरयाच प्रकारचे वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात. दिव्यातून निघणारा प्रकाश नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो व सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

दिव्याच्या ज्योतीतून निघणारा धूर घराच्या वातावरणात असणारे सूक्ष्म रोगजंतू नष्ट करतो व आपले चांगले राहते.

 शास्त्रांनुसार दिवा लावण्याच्या संबंधी काही सामान्य नियम सांगितले गेले आहेत. त्या नियमांचे आपण सर्वांनी पालन करणे आवश्यक ठरते.

पूजा अर्चनेच्या  वेळी दिवा खाली न ठेवता तो अक्षता खाली ठेवून त्यावर दिवा ठेवावा.

रोज सूर्यास्तापर्यंत दिवा प्रज्वलित केल्याने लक्ष्मीमातेची कृपा होते.

 दिवा लावतेवेळी खालील मंत्र जप केल्याने घरात धनधान्य व समृद्धी कायम राहते व सर्व सदस्यांच्या उत्पन्नात भर पडते.

शुभं करोति कल्याणं आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धीविनाशाय च दीपज्योतीर्नमोस्तुते.

Leave a Reply